ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
फळ शेतीयोजना

Fruit Crop Insurance | महाराष्ट्रात ‘या’ योजनेंतर्गत 8 फळपिकांना विमा संरक्षण, जाणून कसा होणार फायदा

शेती अग्रेसर असलेल्या आपल्या देशात विविध पिकांची लागवड (Crop planting) केली जाते. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात.

Fruit Crop Insurance | देशात फळबागांची लागवड (Orchard planting) मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी देखील विविध योजना राबवल्या जातात. फळबागांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात देखील सातत्याने वाढ केली जाते. आता राज्य सरकारने (State Government) 8 फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना या 26 जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आले आहे.

कोणत्या फळपिकांचा योजनेत आहे सामावेश?
संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ आणि द्राक्ष या 8 पिकांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना फळशेती करताना नैसर्गिक आपत्तींचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुसकानीमुळे शेतकरी फळबागांची लागवड करण्यापासून दूर राहतात. हवामानाच्या धोक्यामुळे शेतकऱ्यांना जर पिक विमा योजना मिळाल्या शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसणार नाही. याच उद्देशाने राज्य शासनाकडून या 8 फळशेतीसाठी पुनर्गचित हवामान आधारीत पीक विमा योजना संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा: Yojana | 700 कोटींच्या गुंतवणूकीतून द्राक्ष-डाळिंबासाठी राबवण्यात येणार ‘ही’ योजना, जाणून घ्या काय होणार फायदा

काय आहे योजनेचे उद्दीष्ट?
• आपत्ती व हवामान प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार फळ पिक विमा.
• कोणत्याही परिस्थितीत (नैसर्गिक आपत्ती/ हवामान) मन शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवणे.
• शेतकऱ्यांना नवीन सुधारित मशागती तंत्रज्ञान आणि सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
• कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यामध्ये सातत्य राखणे.

विमा हप्ता
या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने पिक विमा 30 टक्के इतका मर्यादित केला आहे. याचमुळे 30 टक्क्यावरील विमा हप्ता राज्य शासन आणि शेतकरी स्वीकारणे क्रमपात्र आहे. या योजनेअंतर्गत 30 ते 35 टक्के पर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता राज्य शासनाने स्वीकारले आहे. 35 टक्क्यावरील विमा हप्ता राज्य शासन आणि शेतकऱ्यांनी 50-50 टक्के भरायचा आहे.

वाचा: Yojana | ‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळतोय 2 लाखांचा विमा तेही मोफत, जाणून घ्या योजना आणि कागदपत्रे

किती आणि कसे मिळणार विमा संरक्षण?
कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, सापेक्ष आर्द्रता, किमान तापमान या हवामान धोक्यांपासून या योजनेंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे.15 जून ते 14 जुलै या कालावधीत कमी पाऊस असल्याने 76 ते 100 मिनी पाऊस झाल्यास 12 हजार रुपये. तसेच 76 मिमी पेक्षा कमी पाऊस झाल्यास 30 हजार रुपये. 15 जुलै ते 15 ऑगस्ट या वेळेत सलग 15 ते 21 दिवस पाऊस झाल्यास 30 हजार रुपये विमा संरक्षण मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button