ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

राज्य शासनाचा मोठा निर्णय! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार ‘इतक्या’ लाखांची मदत

Agriculture | भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, देशातील निम्म्याहून अधिक नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर (Agribusiness) चालतो. परंतु अनेकदा शेती करताना शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. कधी पैसा अभावी शेती होत नाही तर कधी अतिवृष्टीमुळे (Department of Agriculture) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) उत्पन्न निघण्यास कोणताच मार्ग नसतो म्हणूनच शेतकऱ्यांच्या (Farming) डोक्यावर आर्थिक भार निर्माण होते. यामुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडतात. आता याचं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

वाचा:बिग ब्रेकींग! चीन आणि अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक; केंद्र शासनाने राज्यांना सतर्कतेच्या जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना

किती शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
राज्यामध्ये गत वर्षी 10 हजार 881 तर यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यांच्या काळात विदर्भात 1100, मराठवाड्यात 756, अमरावती विभागात 612, नागपूर विभागात (Department of Agriculture) 198 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. याचं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ह्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लेखी उत्तर दिले आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून जमीनधारक शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 30 हजार, जाणून घ्या सविस्तर..

ब्रेकींग न्यूज! आता शेती विकत घेण्यासाठी मिळणार अनुदान, पात्रता जाणून त्वरित करा अर्ज

काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री म्हणाले की, ”शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या एकूण 2138 प्रकरणांत 1159 प्रकरणे जिल्हास्तरीय समितीने मदतीकरिता पात्र, तर 512 प्रकरणे अपात्र ठरविली आहेत. 437 प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित आहेत. 1148 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत दिली आहे. उर्वरित प्रकरणे तातडीने निकालात काढण्यासाठी जिल्हास्तरीय समिती तातडीने कार्यवाही करेल.”

बिग ब्रेकिंग! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने केली अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘इतक्या’ कोटींची तरतूद

वाचा: ब्रेकींग! ऊस तोडीसाठी पैसे मागितल्यास थेट होणार कारवाई; शेतकऱ्यांना ‘या’ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

“2018 च्या खरीप हंगामापासून आणेवारी पद्धतीनुसार दुष्काळ घोषित करण्यात येत नाही. त्यामुळे त्या निकषानुसार मदत करता येणार नाही. पंचनाम्यांमध्ये 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले तर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार मदत देता येते. यावर्षी 6 हजार 450 कोटी रुपयांची मदत वितरित केली आहे.”

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big decision of the state government! The heirs of suicide farmers will get lakhs of help

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button