ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Cotton | आता भारतीय कापसाच्या मार्केटिंगसाठी नवा ब्रँड! शेतकऱ्यांना ‘असा’ होणार फायदा

देशातील सर्वाधिक नागरिकांचा कल हा शेती व्यवसायावर आहे.

Cotton | भारतात शेती (Agriculture) व्यवसायाला प्रमुख व्यवसाय म्हणूनच पाहिलं जातं. म्हणूनच शेतकरी भरघोस उत्पादन निघणाऱ्या पिकांवर भर देतात. या भरघोस उत्पादनांपैकी एक असलेले पीक म्हणजे कापूस पीक (Cotton crop) होय. तर भारतात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. खर तर, जागतिक स्तरावर कापूस लागवडीवर (plantation) भारत अव्वल स्थानावर आहे. परंतु, उत्पादनात भारत मागासलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना कापूस उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या तयारीत आहे.

वाचा: Poultry Farming | शेतकऱ्यांनो देशी कोंबड्या पाळून मिळवा लाखोंचा नफा, सरकार ‘या’ योजनेंतर्गत देतयं 50 टक्के अनुदान

कापसाचा नवा ब्रँड बाजारात
कापूस उत्पादन (Indian Cotton) वाढावे यामध्ये बियाण्याचा सर्वात मोठा वाटा असतो. त्याचंप्रमाणे ब्रँड देखील तितकाच महत्वाचा असतो. कारण मार्केटिंगशिवाय कोणतीही वस्तू वा उत्पादन विकणे शक्य नाही. म्हणूनच आता भारतीय कापसाला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठीच आता कस्तुरी ब्रँडने भारतीय कापसाचे मार्केटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी तीन विविध समित्यांची स्थापना देखील करण्यात आली आहे.

काय आहे उद्देश?
भारतीय कापसाचे कस्तुरी ब्रँडने मार्केटिंग केल्याने जागतिक स्तरावर भारतीय कापसाची एक वेगळीच नवी ओळख निर्माण होईल. यासाठी कस्तुरी ब्रँडद्वारे भारतीय कापसाचे प्रमोशन केले जाणार आहे. यासाठी तीन समित्या नेमण्यात आल्या आहेत. कापसाचा दर्जा सांगण्यासाठी व्हॅल्यू प्रपोझिशन समिती कार्य करेल. कापसाच्या प्रमाणीकरण विषयक दुसरी समिती काम करेल. तर तिसरी समिती हे निधीची जुळवा जुळव करण्याचे काम करेल. अशाप्रकारे तीन समित्यांमध्ये हे काम वाटून देण्यात आले आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ कारणांमुळे गव्हाच्या किंमतीत होणार वाढ?

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
भारतात शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करतात. मात्र एकरी केवळ 4 क्विंटल उत्पादन निघते. यासाठीच अतिसघन या पद्धतीने कापूस लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय. त्याचबरोबर पूर्वी भारतीय कापसाचा कोणताही ब्रँड नसल्याने भारतीय कापूस जो काही खरेदीदर असेल त्याच दराने विकला जात होता. मात्र आता कस्तुरी ब्रँडमुळे जगभरात भारताच्या कापसाला एक विशेष ओळख मिळणार आहे. त्यामुळे ब्रँड आणि दर्जा पाहूनच कापसाचा दर ठरेल. त्यासह स्वतःचा ब्रँड असल्याने इतर देशांप्रमाणे भारत देखील कापसाचा दर निर्धारित करू शकणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button