Farmers Compensation| मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, आता नुकसान झालेल्या शेतीचे ‘असे’ होणार पंचनामे
Farmers Compensation|अवकाळीमुळं आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. प्रशासनानं तातडीनं पंचनामे करावे यासाठी शेतकरी आग्रही आहेत. यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण होण्यासाठी आणि त्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी जूनपासून ई-पंचनामे करण्यात येणार आहेत. तसंच नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली.
वाचा: शिंदे फडणवीस सरकारचा धडाकेबाज निर्णय, ‘हे’ साखर कारखाने ठरणार कर्जासाठी अपात्र
काय म्हणाले मुख्यमंत्री
गेल्या काही वर्षांपासून हवामान झालेला बदल, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादी अनेक समस्यांनी शेतकरी त्रस्त आहेत. यासाठी शेतकरी अनेक उपाय करत असले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची गरज असते. यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होणे गरजेचे असते. त्यामुळे यासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची मदत घेणं क्रमप्राप्त आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणाऱ्या मदतीत वाढही करण्यात आली आहे. याशिवाय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून (एसडीआरएफ) द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर लागू करण्याबरोबरच आता तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे. आपलं शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना आधार देणं हेच आपलं कर्तव्य आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आता होणार ई पंचनामे
सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या एकदिवसीय परिषदेत शिंदे बोलत होते. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विभागांचे सचिव या वेळी उपस्थित होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पारदर्शकपणे आणि तातडीने मदत मिळावी यासाठी मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं मोबाइलद्वारे ई-पंचनामे करण्यात येणार आहेत. तसेच सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. या कामासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
वाचा: आता शेतीला मिळणार दिवसा वीज, राज्य मंत्रीमंडळाचा ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर
आधिकाऱ्यांना दिल्या सूचना
प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेमुळे शेतकऱ्यांना मोलाचा हातभार मिळणार आहे, तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. वीज पडून होणारे मृत्यू आणि तीव्र उष्णतेमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
हेही वाचा:
- स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही शेतकऱ्यांच्या वाटेत चिखलच, ‘या’ जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची परिस्थिती बिकट
- मे अखेर राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार दोन हजार रुपये, यासाठी काय करावं लागणार, वाचा सविस्तर
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..