ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Farm Electricity| आता शेतीला मिळणार दिवसा वीज, राज्य मंत्रीमंडळाचा ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

Farm Electricity| शेतकऱ्यांना होणारा सगळ्यात मोठा मनस्ताप म्हणजे त्यांना देण्यात येणारी वीज. शेतकऱ्यांना आतापर्यंत नेहमीच रात्रीची वीज देण्यात येत होती. यामुळे दिवसभर काबाडकष्ट करून शेतीला पाणी देण्यासाठी रात्रभर जाग राहावं लागत असे. मात्र आता शिंदे सरकारनं एक निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांची ही डोकेदुखी कमी होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणं शक्य होणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसभर वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 सुरू करण्यात येणार आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

राज्य मंत्रिमंडळाची बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इतर मंत्री उपस्थित होते या बैठकीत शेतकऱ्यांसहित अनेक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये शिक्षण, आरक्षण आणि काही ठिकाणी न्यायालयांची निर्मिती करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच केंद्र सरकार प्रमाणेच राज्यातही दिव्यांगांना पदोन्नती आरक्षण देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना 2

कृषी क्षेत्रासाठी वीज ही नेहमीच रात्री दिली जात असे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असे. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळांना एक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना 2 राबविण्यात येणार आहे. राज्य सरकारने 2019 मध्ये या योजनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात केली होती. या योजनेचा उद्देश 2023 पर्यंत एक लाख कृषी पंप बसवण्याचा होता. बुधवारी झालेल्या बैठकीत पुढचा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

हा होणार लाभ

राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास आठ हजार मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. त्यासाठी बारा ते तेरा हजार मेगावॅटचे प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. तसेच उपकेंद्रांसाठी शेतकऱ्यांची जमीनी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. रेडी रेकनरच्या 6 टक्के किंवा हेक्टरी 75 हजार रुपये इतक्या भाडेतत्त्वावर ही जमीन घेण्यात येईल. तसेच जमिनीची मालकी असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 2 टक्के वाढ देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बाबतीत म्हणाले की शेतकऱ्यांची जमीन तीस वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकरी 50 हजार रुपये भाडं देण्यात येईल आणि यामध्ये दरवर्षी वाढ करण्यात येईल.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button