Corona | बाप रे! कोरोनातून बऱ्या झालेल्या 50 टक्के रुग्णांना उद्भवतायत ‘ही’ लक्षणे
जगात कोरोना महामारीने मागच्या 2 वर्षापासून थैमान घातले आहे. मात्र, देशामध्ये (Country) आता कोरोना विषाणूची (Corona virus) तिसरी लाट ओसरली आहे.
Corona | तर अनेक राज्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये (Coronary artery disease) कमालीची वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा (Number of patients with coronary heart disease) चार कोटींवर पोहचला असून गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे २,८२७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, २४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Experts claim | तज्ञांचा दावा
तज्ञांनी केलेल्या कोरोना विषाणूच्या अभ्यासात एक नवीन माहिती समोर आली आहे. या अभ्यासामध्ये तज्ञांना आढळून आले आहे की, कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांच्यामध्ये कोरोनाचा प्रभाव दिसून येत आहे. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनातून बरे झाल्यानंतर दोन वर्षांनी ५० टक्के लोक असे आहेत ज्यांच्यामध्ये कोरोनाचे एक तरी लक्षण दिसत असल्याचा दावा केला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतरही उद्भवतायत समस्या
कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर देखील चालताना आणि सोपे काम करताना देखील धाप लागत आहे. तसेच, त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे, नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप या आजारांवर दुर्लक्ष न करता वेळीच रुग्णालयात जाऊन तपासून येणे गरजेचे आहे.
आरोग्य मंत्र्यांनीही वर्तवला कोरोनाचा धोका
दरम्यान, कोरोना व्हायरसचा धोका अद्याप संपलेला नसून, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) या जागतिक आरोग्य संघटनेने आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कोरोनाची चौथी लाट लवकरच भारतात येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. वाढती रूग्नसंख्या ही चिंतेची बाब असून आरोग्य विभाग आता सतर्क झाले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: