Wheat | भारतीय गव्हात रुबेला विषाणू असल्याचा तूर्किचा आरोप, जाणून घ्या रुबेला विषाणू आहे तरी काय?
Wheat | मे महिन्यामध्ये हजारो टन भारतीय गहू (Indian wheat) हा तुर्कस्तानातून गुजरातच्या (Gujrat) बंदरावर परत आला आहे. भारतीय गव्हात रुबेला विषाणू (Rubella virus) आढळल्याचे तूर्किने म्हटले आहे. याच कारणामुळे जगभरात भारतीय गव्हासंदर्भात शंका उपस्थित होत आहे.
भारतीय रुबेला विषाणू रूबेला
भारतीय गव्हात रूबेला विषाणू असल्याचे कारण देऊन तुर्कीने भारतीय गहू परत केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये तीन महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेला खरखर लागली आहे. त्यामुळे अनेक देशांकडून भारत सरकारकडून गव्हाच्या निर्यातीवरील बंदी हटवा मागणी करत आहे. तर दुसरीकडे तुर्कीने भारतीय खराब असल्याचे सांगून तो परत केला आहे. 29 मे पासून तब्बल 56 हजार टन गहू तुर्कीतून गुजरातच्या बंदरावर परत आला आहे.
वाचा: App | ‘ई-पीक पाहणी’ ऍपमुळे पिकाची नोंदणी होणारं चुटकीसरशी, जाणून घ्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया
वाचा: Poultry Farming | कुक्कुटपालन अनुदानासाठी अर्ज सुरू, लाभार्थ्यांना मिळणार ‘इतके’ अनुदान
रूबेला विषाणू आहे तरी काय?
तुर्कस्तानने भारतीय गव्हात रुबेला विषाणू असल्याचा आरोप केला आहे. हा रुबेला विषाणू नेमका आहे तरी काय हे जाणून घेऊया. रूबेला विषाणू किंवा जर्मन गोवर हा संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे संसर्गजन्य रुग्णांमध्ये शरीरावर लाल पुरळ निर्माण होते. रुबेला विषाणूचा संसर्ग तीन ते पाच दिवस टिकू शकतो आणि त्यातून रूबेलाचा प्रसार होऊ शकतो. रशिया यांच्यातील महायुद्धामुळे भारतीय गव्हाची मागणी वाढली आहे. त्यामुळे भारताला निर्यातीवर बंदी घालावी लागली.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: