ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तब्बल 32 कोटींचा पीक विमा मंजूर

Crop Insurance | नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होते. त्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. परंतु अनेकदा पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांचा पिक विमा (Crop Insurance) मंजूर करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी त्यांना समोर जावं लागतं. नुकताच आता शेतकऱ्यांचा कोट्यवधींचा पीक विमा (Crop Insurance) मंजूर करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर
मागच्या वर्षी अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन, कापूस यांसारखी अनेक शेतकऱ्यांची पिके तर भुईसपाट झाली. त्यामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी भरपाईची मदत देखील देण्यात आली होती. त्याचबरोबर शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पिक विमा (Crop Insurance) कंपन्यांकडे क्लेम केले होते. आता याच शेतकऱ्यांचा आता पिक विमा मंजूर झाला आहे.

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा झाला मंजूर?
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिक विमा कंपन्यांकडे क्लेम केले होते. आता याच शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर झाला आहे. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या पीक विम्यामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

अखेर पीक विमा झाला मंजूर
वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. तरी देखील शेतकऱ्यांचे पिक विमा मंजूर करण्यात आले नव्हते. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी संघटनेकडून पिक विमा साठी आंदोलने करण्यात आली. तेव्हा कुठे वाशीम जिल्ह्याचा पिक विमा मंजूर झाला आहे.

किती पीक विमा झाला मंजूर?
अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अक्षरशः दयनीय झाली होती. कारण तेथील शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटले होते. एकीकडे उत्पादनात घट तर दुसरीकडे सोयाबीनला चांगला भावही मिळाला नाही. अखेर आता वाशीम जिल्ह्यातील 21 हजार 949 शेतकऱ्यांना 32 कोटी 71 लाख 77 हजार 922 रुपये इतका पीक विमा मंजूर झाला आहे. आता या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! 32 crore crop insurance approved for the farmers of district

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button