राज्य सरकारची नवी अट: ‘या’ वर्षातील कर्जदारांना मिळणारं ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान; जाणून घ्या पात्रता
राज्याच्या नव्या अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे महात्मा फुले कर्जमाफी अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजाराचे अनुदान मिळणार आहे. यासाठी कर्जमाफीच्या लाभासंदर्भात अभ्यास करण्यासाठी यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काही मंत्र्यांची उपसमिती स्थापन केली आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
राज्य सरकारच्या या नव्या निर्णयाअंतर्गत राज्यातील जवळ जवळ २० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची दिनांक 30 जून 2020 पर्यंत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2018- 19 मध्ये घेतलेल्या पीक कर्ज रकमेवर ही 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी 2018-19 मध्ये पीककर्ज घेतलेले आहे पण त्यांची रक्कम ही 50 हजारापेक्षा कमी आहे त्यांना कर्जाएवढ्या रकमेची मदत केली जाणार आहे.
वाचा: होलिका दहन चा शुभ मुहूर्त घ्या जाणून; अन्यथा हू शकते धन हानि…
महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिक लाभ
राज्य सरकारने हे वर्ष ‘शेतकरी महिला सन्मान वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे. यासाठी राज्यसरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी म्हणून ७५ हजार रुपये मिळणार आहेत. याकरिता 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा: