lang="en-US"> Rental agreement |अंबानी ने नवी मुंबईत 3,750 एकर जमिनीचा भाडे करार

Rental agreement |अंबानी ने नवी मुंबईत 3,750 एकर जमिनीचा भाडे करार केला; जागतिक आर्थिक केंद्र उभारण्याची योजना!

Rental agreement |मुंबई, 5 जून 2024: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ने आज एका महत्वाच्या घोषणेमध्ये जागतिक आर्थिक केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्रात 3,750 एकर जमिनीचा भाडे करार केल्याचे जाहीर केले आहे.

RIL च्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांनी नवी मुंबई IIA प्रायव्हेट लिमिटेडकडून 43 वर्षांसाठी सुमारे 3,750 एकर जमिनीसाठी हा भाडे करार केला आहे. या कराराची किंमत 13,400 कोटी रुपये आहे.

रिलायन्सने दिलेल्या माहितीनुसार, हे जमीन महाराष्ट्र औद्योगिक धोरण, 2013 च्या नियमानुसार औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी वापरले जाईल. यात जागतिक भागीदारीसह जागतिक दर्जाचे डिजिटल आणि सेवा उद्योग क्षेत्राचा समावेश असेल.

2018 मध्ये, रिलायन्सने महाराष्ट्र सरकारसोबत या जागतिक आर्थिक केंद्रासाठी करार केला होता. यावेळी, मुकेश अंबानी यांनी म्हटले होते की, “आरआयएल महाराष्ट्रात चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी भारतातील पहिले औद्योगिक क्षेत्र स्थापन करेल आणि पुढील 10 वर्षांत 60,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करेल.”

वाचा : Fight | लग्नमंडपातच नवरा-नवरीमध्ये तुंबळ हाणामारी! काय घडलं बरं?३६ गुण जुळले…

या जमिनीच्या भाडे करारामुळे रिलायन्सची महाराष्ट्रातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मदत होईल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

रिलायन्सची महाराष्ट्रात गुंतवणूक:

या जमिनीच्या भाडे करारामुळे काय होईल?

Exit mobile version